*भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य आयोजित तेरा आगस्ट रोजी परिवर्तन सभा होणार सभेच्या राजेश आनंदा मालचे यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड*. शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :- शिंदखेडा येथे नुकतीच भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य च्या पदाधिकारी ची बैठकीचे आयोजन करण्यात आले. सदर बैठक संस्थापक अध्यक्ष दिपक दादा अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. शिंदखेडा शहरासह धुळे, नंदुरबार, जळगाव, आदी जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सालाबादप्रमाणे यंदाही 9 आगस्ट विश्व आदिवासी दिवसांच्या निमित्ताने 13 आगस्ट रोजी परिवर्तन सभा घेण्याचा निर्णय झाला.त्यानंतर. खालील विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. त्यात
1) जल जंगल जमीन स्वावलंबन स्वाभिमान
२) शिक्षण आरोग्य व्यसनमुक्त व संघटन
३) अतिक्रमणाच्या नावांवर आदिवासी समाजाला जमीन व घरापासून बेदखल करण्याचा षडयंत्र महाराष्ट्र सरकाराचा सुरू आहे
४) राजकीय व सामाजिक भागीदारी व नेतृत्व,
विषयांवर चर्चा करण्यात आली. तेरा आगस्ट रोजी होणाऱ्या
परिवर्तन सभा साठी राजेश आनंदा मालचे यांनी एकमताने निवड झाल्याचे
दिपक दशरथ अहिरे
भिल समाज विकास मंच महा राज्य
संस्थापक अध्यक्ष यांनी जाहीर केले. हयाप्रसंगी दिपक अहिरे, राजेश मालचे, अशोक सोनवणे,सुनील सोनवणे,अर्जुन सोनवणे, जिभाऊ फुले,श्रीराम मोरे, पुंडाराम मोरे, शहादा येथील राजेंद्र सोनवणे, रविंद्र ठाकरे,न्हानभाऊ सोनवणे,अशोक मालचे, कालु मोरे,राज सोनवणे,राम सोनवणे, पिंटू मालचे, गोकुळ मोरे, दिनेश सोनवणे,अधिकार ठाकरे,भैय्या मालचे,जगदीश बागुल, जयसिंग मोरे,गोपाल मालचे, बुधा भिल,दिलीप भिल,शाम भिल,महेंद्र भिल, नामदेव भिल, दिलीप मालचे,सुरेश भिल आदी सह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. परिवर्तन सभा यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी नी आपल्या मनोगतातुन सुचना व मत व्यक्त केले. जास्तीत जास्त आदिवासी समाजाला सदर सभेसाठी उपस्थित ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत असे संस्थापक अध्यक्ष दिपक अहिरे यांनी आवाहन केले.



















