दिल्ली येथे केद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान याची पणन मंत्री जयकुमार रावल यांनी घेतली भेट शेतकऱ्यांच्या हितावह सह विविध विषयावर चर्चा. शिंदखेडा माझा ( यादवराव सावंत ) :-. दिल्ली येथे केंद्रीय कृषीमंत्री मा.श्री. शिवराजसिंह चौहान यांना भेटून राज्याचा पणन मंत्री म्हणून मी जयकुमार रावल आणि कृषी मंत्री श्री. माणिकराव कोकाटे यांनी महाराष्ट्र कृषी पणन मंडळ आणि नेदरलँड्सच्या सहकार्याने पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे आशियातील प्रथम राष्ट्रीय काढणीपश्चात तंत्रज्ञान संस्था (नॅशनल इन्स्टिट्यूट आफ पोस्ट हार्वेस्टिंग टेक्नॉलॉजी) स्थापन करण्यात आली आहे. हरितगृह तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण देणारी ही संस्था शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान शिकवून उत्पादनांचे मूल्यवर्धन, साठवणूक आणि बाजारपेठेतील स्थैर्य वाढवण्यास मदत करणार आहे. या संस्थेला नोडल एजन्सीचा दर्जा देण्याच्या मागणीचे निवेदन दिले.
तसेच छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील जांबरगाव येथे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गालगत कृषी लॉजिस्टिक्स हब उभारण्यात आला असून, याचे उद्घाटन केंद्रीय कृषिमंत्री यांच्या हस्ते व्हावे यासाठी कृषिमंत्री शिवराजसिंहजी चव्हाण यांना निमंत्रण दिले. या हबमध्ये 10,000 मेट्रिक टन क्षमतेचे कोल्ड स्टोरेज, क्लिनिंग-ग्रेडिंग युनिट्स, पेट्रोल पंप, ट्रक टर्मिनल्स व गोदामाची सुविधा आहे. यामुळे फार्म-टू-मार्केट साखळी अधिक सक्षम होणार असून, नुकसानही कमी होईल, अशी माहिती ही त्यांना दिली.यावेळी त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.


















