नांदेड येथील राजेंद्र शंकरपुरे यांना भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय समाजरत्न आदर्श कृषी उदयोजक पुरस्काराने गौरव
✍️ नांदेड जिल्हा प्रतिनिधी –

पुणे येथील ए.डी. फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित कार्यक्रमात भारत रत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय समाज रत्न पुरस्कार नुकतेच प्रदान करण्यात आले त्यात नांदेड येथील
कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी आणि समाजघटकासाठी योगदान दिल्याबद्दल राजेंद्र जगन्नाथराव शंकरपुरे (फरांदे पार्क, नांदेड) यांना आदर्श कृषी उदयोजक हा मानाचा पुरस्कार शाल, मेडल,सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन प्रदान करण्यात आला. या गौरव सोहळ्याला तुकाराम बाबा महाराज मठाधिपती आश्रम, वैशाली चव्हाण (सहाय्यक आयुक्त, मनपा पुणे), श्रीराम मांडुरके (पोलीस आयुक्त, पुणे), प्राजकता मालुजकर (रील स्टार), श्रेया परदेशी व ममता भोई (खानदेश अभिनेत्री) यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. राजेंद्र शंकरपुरे यांचे
शिक्षण : B.Sc., Agri
कृषी बि-बियाणे निर्मीती व इतर सामाजिक कार्य
क्रांन्ती क्रॉप सायन्सेस कंपनी नविन मोंढा, नांदेड
या माध्यमातून करत आहेत.
१५ वर्षे महीको या कंपनीत नोकरी करुन २००५ मध्ये कंपनीची स्थापना करुन भाजीपाला सुधारीत बियाणे, देशी बियाणेचे संशोधन करुन ४२ वाणांची निर्मीती केली. शेतकरी हे बियाणे वापरत असुन भरघोस उत्पन्न घेत आहे. अशा प्रकारे दर्जेदार व गुणवत्ता पूर्वक बियाणे तयार करण्यात आली. कोणत्याही प्रकारचे कर्ज न घेता.
योग शिक्षक निःशुल्क योग वर्ग चालवणे.
ओम शांतीचे आध्यात्मीक ज्ञान देण्याचे कार्य.
वृक्षमित्र फाऊंडेशन मार्फत पर्यावरण पुरक वृक्ष लागवड कार्यक्रमात सक्रीय सहभाग असतो.
शेतकऱ्यांना देशी बियाणे, सुधारीत बियाणे व सेंन्द्रीय, विषमुक्त शेती करण्या बाबत सतत मार्गदर्शन करित असतात *शैक्षणिक व सामाजिक योगदान*
राजेंद्र शंकरपुरे हे केवळ कृषी क्षेत्रातच नव्हे तर शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातही अत्यंत सक्रीय आहेत. ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी वेळोवेळी शैक्षणिक साहित्य वाटप, शाळांमध्ये संगणक व ई-लर्निंगसारख्या सुविधा पुरवण्यात पुढाकार घेतला आहे.
सामाजिकदृष्ट्या त्यांनी शेतकरी मार्गदर्शन शिबिरे, महिला सबलीकरण उपक्रम, वृक्षारोपण मोहिमा, ग्रामस्वच्छता अभियान आणि बेरोजगार युवकांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण शिबिरे आयोजित करून समाज upliftment मध्ये मोलाचे योगदान दिले आहे.
त्यांची कार्यशैली ही ‘प्रत्यक्ष कृतीतून सेवा’ या तत्त्वावर आधारित आहे. त्यामुळेच त्यांचे कार्य संपूर्ण जिल्ह्याच्या व राज्याच्या पातळीवर आदर्शवत मानले जाते. त्यांना मिळालेल्या सर्वोच्च पुरस्कार बद्दल सामाजिक बांधिलकी व कौतुकास्पद म्हणून त्यांच्या मित्र परिवारांनी त्यांचा एकत्रित सत्कार घडवून आणला. ✍️ संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा









