- महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य निवडणूक तीन टप्प्यात होणार सुत्र दिवाळी नंतर वाजणार बिगुल ✍️ संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा न्युज.
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक बऱ्याच ठिकाणी लांबणीवर पडल्या होत्या. त्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका नगरपंचायत नगरपरिषद महानगरपालिका हयाचा समावेश आहे. कोर्टाच्या आदेशानुसार चार महिन्यांपूर्वी निवडणूक घेण्यासाठी आदेशीत केले होते. त्या पाश्वभूमीवर सर्वच पक्ष प्रमुखांची इच्छुक उमेदवाराची चाचपणी सुरु झाली आहे. परंतु पावसाळा व सणासुदीच्या कालावधी लक्षात घेता दिवाळी नंतर च सर्व मुदत संपलेल्या निवडणूक एकत्रित घेणे शक्य नसल्याने त्या तीन टप्प्यात होणार असल्याचे खात्रीशीर वृत्त हाती लागले आहे. म्हणजेच दिवाळी नंतर निवडणूकीची धामधूम सुरु होणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या निवडणूक होणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक होणार आहेत. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात मुंबई सह इतर महानगर पालिका निवडणूक होणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली आहे. म्हणून दिवाळी नंतर निवडणूकीची आचारसंहिता व बिगुल महाराष्ट्रातील सर्वच निवडणूकीची वाजणार आहे. असे असले तरी सर्व पक्ष प्रमुखांच्या गुप्त बैठकी ,चाचपणी,इतर कागदपत्राची जुळवाजुळव होतांना दिसत आहे. निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यावरच खरि रंगत येणार आहे.









