“एस. एस. व्ही. पी. एस. महाविद्यालय शिंदखेडा येथे पर्यावरण संरक्षण व संवर्धन जनजागृती अभियान संपन्न “.
✍️ संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग आणि श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे कै. शं. दे.पाटील उर्फ बाबुराव दादा साहित्य,वाणिज्य कै. भाऊसाहेब म. दि. सिसोदे विज्ञान महाविद्यालय शिंदखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संरक्षण व संवर्धन जनजागृती उपक्रम अभियान कार्यशाळेचे दीप प्रज्वलन व वृक्षांना जलार्पण करून मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
सदर कार्यशाळेस महाविद्यालयाचे अध्यक्ष बापूसाहेब प्रफुल्ल कुमारजी सिसोदे, उपाध्यक्ष बापूसाहेब अशोकजी पाटील स्थानिक कार्यकारिणीचे सदस्य प्रा. सुरेशजी देसले प्रमुख वक्ते प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. पवार, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. बोरसे, उपप्राचार्य डॉ. व्ही. एस. पवार, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एस. टी. राऊळ, कार्यालयीन अधीक्षक राहुल बापू पाटील, प्रा. डॉ. आर. के. पवार. प्रा. डॉ. आशा कांबळे, प्रा. डॉ. सचिन जाधव, प्रा. डॉ. एस. बी. सावंत,प्रा. व्ही. पी. राजपूत, प्रा. आर. एन. पाटील. प्रा. आर. आर. पाटील प्रा. स्वप्निल गांगुर्डे आदी उपस्थित होते. कार्यशाळेत 90 विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.
प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पर्यावरणाचे महत्त्व,पर्यावरण संरक्षण,पर्यावरण बाबत जागृती व शिक्षण, पर्यावरणाचे संवर्धन काळाची गरज याबद्दल उदाहरणासहित मार्गदर्शन केले. तसेच वृक्षवल्ली आम्हा सोयरे या तुकाराम महाराज यांच्या ओवी कशा दैनंदिन जीवनात आपण अंगीकाराव्यात तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या रयतेला वृक्षांची तोड करू नका कोरडी झालेली आहेत त्यांचाच वापर करावा असे सांगितले. तसेच वाढते प्रदूषण वृक्षतोड व हवामान बदल यामुळे मानवी जीवन धोक्यात आले असून पर्यावरण संवर्धन ही केवळ चळवळ न राहता प्रत्येकाची जबाबदारी बनली पाहिजे वृक्षारोपण, जलसंधारण, प्लास्टिकचा वापर टाळणे यासारख्या उपायांवर भर द्यावा असे प्रतिपादन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.एस. पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की हवामान बदल कोणत्या कारणांमुळे होतात या बाबी सांगितल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.ए. डी. कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. ज्ञानेश्वर सोनवणे यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. के. एन. दांडगे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू-भगिनी शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.















